Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
दान, यश व दुष्कीर्ती, हे जे विकार सर्व ठिकाणी रहातात ते माझ्यापासून प्राण्याच्या ठिकाणी उत्पन्न होतात.पण याची समज बहुधा सामान्य जीवाला नसते.यश आले की ते मी मिळवले आहे आणि अपयशाने अपकीर्ती आली की मग मात्र त्याचं खापर आपण कुणावर तरी फोडण्याची तयारी करतो.वास्तविक या दोहोंचाही कर्ता करविता मी आहे असं भगवंत म्हणतात,व्यक्ती तितक्या प्रवृत्ती हे आपण जाणतोच.मनात वेगवेगळ्या प्रकारचे भाव निर्माण होतात.
प्रकाशु आणि कडवसें । हें सूर्याचिस्तव जैसें । प्रकाश उदयीं दिसे । तम अस्तुसीं ॥ ८८ ॥
सज्जनहो जाणीव हाच भगवंत आहे असं अनेकदा म्हटलं जातं.अंधार आणि प्रकाशाचं कारण सुर्य आहे. तसं भगवंताच्या ज्ञानाने आणि अज्ञानानेच सम आणि विरुद्ध घटना घडत असतात.मनुष्य मात्र अपयशाने जळत रहातो.वास्तविक परतत्वापासुनच आत्मत्त्वाची निर्माती आहे. आपण केवळ आपल्यापुरता विचार करतो.त्याच कारणाने आनंद,दुःख होते.
Prev Post
Next Post